महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत”वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत अंतर्गत एकदिवसीय वाचन कौशल्य कार्यशाळेत “वाचन संस्कृतीची विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका” या विषयावरील अ.र.भा.गरुड महाविद्यालयातील आय. क्यू.ए. सी. समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
त्यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती या विषयावर उदबोधित करतांना पुस्तकांच्या दुनियेतील सफर घडवून आणली.जगातील वाचकांच्या तुलनेत भारतीय वाचक यांची भूमिका तसेच महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील पुस्तकांच्या “भिलार” या गावाविषयी विस्तृत माहिती दिली.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून वाचनातून येणारी प्रगल्भता ही विद्यार्थी दशेत नक्कीच यश मिळवून देते असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भोळे हे अध्यक्ष स्थानी होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय समरोपतून वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवून विविध संधी उपलब्ध होतात असे प्रतिपादन केले.तसेच विद्यार्थ्याना यशस्वी होण्यासाठी वाचनाचा प्रचंड व्यासंग असावा असे मांडले. तर ग्रंथपाल प्रा. धम्मा धारगावे यांनी आपल्या प्रास्ताविक मधुन कार्यक्रमाची रूपरेषा आणि महत्त्व सांगितले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख प्रा.डॉ.अमर जावळे, प्रा.अप्पा महाजन, प्रा.प्रमोद सोनवणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.योगिता चौधरी, डॉ.ए.एन.जिवरग, डॉ.आर.डी.गवारे, डॉ.सुजाता पाटील,डॉ.भूषण पाटील व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रम आयोजना करिता ग्रंथपाल प्रा.धम्मा एच.धारगावे, तसेच ग्रंथालय सहाय्यक श्री.मोहन पाटील यांनी परिश्रम घेतले.
Image gallery : वाचन संस्कृती चारित्र्य व राष्ट्र निर्माणासाठी महत्त्वाची